nuksan bharpai राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे.
मात्र यात एक गंभीर बाब समोर आलेली आहे. ती म्हणजे तालुकानिहायक ठरवून एखाद्या पिकाचेच जास्त नुकसान दाखविण्याचा प्रकार पंचनामे करताना दिसून येत आहे.
nuksan bharpai
तर बाकी पिकांचे कमी नुकसान दाखवल्यास जात आहे. यामुळे पंचनामे करताना शेतकऱ्यांना कमी भरपाई द्यावी लागेल अशा प्रकारचेच पंचनामे महसूल विभागाकडून केल्या जात असल्याचे आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
![nuksan bharpai](https://i0.wp.com/sarkariyojna.atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/09/image.gif?resize=498%2C282)
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर 75% अनुदान कृषी औजारे खरेदीसाठी
नुकसान भरपाई शासनाकडून कश्याप्रकारे मिळणार
- nuksan bharpai शेतकऱ्यांना दिल्या जाणारी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या पिकाची किती टक्के नुकसान झाले यावर ठरते.
- याकरिता एनडीआरएफच्या निकषानुसार पंचनाम्यात जर 33% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान दाखवले असेल.
- तर करोडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार 500 रुपये तसेच बागायती करिता 17 हजार रुपये दिल्या जातात.
- एकरी हिशोब बघितला तर कोरडवाहू करीता एकरी 3 हजार 400 रुपये तसेच बागायती करिता 6 हजार 800 रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई दिल्या जाते.
- तसेच कमीत कमी करोड वाहू पिकांसाठी किमान 1 हजार रुपये तर बागायती पिकांसाठी किमान 2 हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद केलेली आहे.
- म्हणजे काय तर पीक नुकसानीच्या पंचनाम्यात 33% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे क्षेत्र किती नोंदविले गेले यावरून शेतकऱ्यांना किती रक्कम मदत म्हणून मिळणार हे अवलंबून आहे.
![nuksan bharpai](https://i0.wp.com/sarkariyojna.atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/09/image.gif?resize=498%2C282)
अकुशल मजुरी दिवसातच, मनरेगा योजनेत बदल
nuksan bharpai
तसेच एक विशेष बाब म्हणजे पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश हे फक्त खरीप हंगामातील पिकांकरिताचे दिलेले आहे.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिके जसे की हरभरा, गहू, ज्वारी, या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
मात्र रब्बी हंगामातील या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशच नसल्याचे तसेच पावसाचा फटका रब्बी पिकांना कमी बसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
तर एकंदरीत काय तर मदतीच्या नावाखाली फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला शासनाकडून यावेळी सुद्धा पाण्यात रुसली जाणार असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे.
1 जनवरी से नहीं कर पाएंगे ऑनलाइन पेमेंट! आज ही निपटा लें ये काम
Discover more from
Subscribe to get the latest posts sent to your email.